श्रीराम. या जगात अध्यात्म सांभाळणारी एक व्यवस्था आहे. ती व्यवस्था टिकवणारी ईश्वरशक्ती वेळोवेळी थोर महात्म्यांना पृथ्वीवर मानव समाजात जन्मास घालते. त्या महात्म्यांच्या बरोबर त्यांच्या कामाला उपयोगी पडणारी अशी माणसे जन्माला येतात. ती माणसे समाजातील साधकांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मार्गांनी सहाय्य करतात. साधकांना जी मदत मिळते तिचा दुहेरी परिणाम होतो. त्या मदतीने साधकाचे स्वरूपानुसंधान वर्धमान राहते हे तर खरेच, पण त्याच्या जगण्याचे क्षेत्र व्यापक होऊन अनेक स्त्रीपुरुष अध्यात्माकडे वळतात. अध्यात्माची ही पार्श्वभूमी गूढ आहे पण ती अत्यंत खरी आहे यात शंका नाही!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे
No comments:
Post a Comment