Translate

Saturday, October 3, 2015

ज्ञानेश्वरी विचारधारा २-

श्रीराम. आज तीन गोष्टी सांगतो तुम्हाला. या अगदी अनुभवाच्या आहेत. या गोष्टी झाल्या तर आपले भाग्य उदयाला आले असे समजावे!

१) हे अध्यात्म शास्त्र असे आहे, की ते एखाद्या व्यक्तीच्या तर्फेच रात्रंदिवस कानी पडावे; तरच हे साधते.

२) दुसरी गोष्ट अशी की स्वाभाविकच अनासक्त वृत्ती असावी. पैशाचे प्रेम फार नसावे, देहाचे प्रेम फार नसावे ही पुण्यायीचीच गोष्ट आहे.

३) आणि तिसरी गोष्ट ही की भगवंताचे स्मरण मला असावे ही स्वाभाविक तळमळ असावी.
या तीन पुण्यायीच्या गोष्टी आहेत. त्या जर अंगी आल्या तर पुण्य उदयाला आले असे समजावे!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड १ ला)

No comments:

Post a Comment