नामस्मरणाच्या अभ्यासाला तळमळ आवश्यक;
तत्त्वज्ञानाचा उपयोग साधनेसाठी!
तत्त्वज्ञानाचा उपयोग साधनेसाठी!
परमपूज्य बाबा बेलसरेंच्या ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या खंडाच्या प्रस्तावनेतील काही भागाचा सारांश -
ती. बाबा एकदा अगदी सहज बोलताना म्हणाले, "अरे, सामान्य माणूस आपली डिग्री मिळवण्यासाठीसुद्धा पद्धतशीर प्रयत्न करीत नाही; अभ्यासाची पद्धत किती जणांना माहीत असते? नामस्मरण हा एक जन्मभर चालणारा अभ्यास आहे याची जाणीव किती लोकांना असते? मग अर्धवटपणे केलेल्या नामस्मरणाने काय साध्य होईल?" अशा त्यांच्या काही सूचना वाचकांना कदाचित आवडणार नाहीत, कारण सत्य हे कटू असते आणि ते श्रोत्यांना ऐकायला आवडत नाही. पण, जे अप्रिय आहे, परंतु पथ्यकारक आहे, ते सांगणारा व ऐकणारा भेटणे दुर्लभ असते!
ज्ञानेश्वरीच्या दुसरा अध्याय आणि त्यावरचे ती. बाबांचे विवेचन याचा अभ्यास झाल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की ती. बाबांना या सर्व विवेचनातून वाचकांना असे सांगावयाचे आहे की, या तत्त्वज्ञानाचा उपयोग केवळ आपल्या बुद्धीचे समाधान होण्यासाठी नसून त्याचा उपयोग आपले साधन अधिक दृढ व्हावे यासाठी केला पाहिजे. आपले साधन अधिक सातत्याने, चिकाटीने व नीट समजून केले तर ते अधिक फलदायी होईल. ती बाबा म्हणत, साधन हा एक अभ्यास आहे आणि तो जन्मभर चालणारा आहे.
माणूस पदवी मिळवण्यासाठी, नंतर व्यवसायात यश, पैसा ऐश्वर्य मिळावे म्हणून, समाजात मानमान्यता मिळावी म्हणून अभ्यास करतोच. याला Management of Objective असे म्हणतात. परमार्थाची साधना ही अशी नाही. ती कर्मयोगासारखी जास्त आहे.
***"हा अभ्यास सतत त्याच तीव्रतेने चालणे हेच त्याचे फळ आहे"***
महाराज म्हणत असत की, नामाने काय साधावे तर नामच साधावे!
No comments:
Post a Comment