नाम घेत आहोत म्हणजेच योग्य मार्गावर आहोत!
श्रीराम.
~~ एक माणूस गिरणीच्या यंत्रशाळेत गेला. तिथे त्याचे उपरणे एका चाकात अडकले, तर हा हा म्हणता तो सर्वच त्यात ओढला गेला. तसे माणूस भगवंताचे नाम घेऊ लागल्यावर तो पोहोचतोच यात शंका नाही. त्याची जी खेच आहे, त्याला अभिक्रम म्हणतात.
~~ भगवंताचे घेतलेले नाम कधीही वाया जात नाही.
~~ आपली आतली घाण जेवढी असते ती नाहीशी करण्यास लागणारा प्रयत्न आपला होत नाही, म्हणून आपली प्रगती दिसत नाही.
~~ महाराज एकदा म्हणाले, "गाईने शेण टाकले की ते थोडीतरी माती घेतल्याशिवाय उठणार नाही. तसे तुम्ही थोडी जरी भक्ती केलीत तर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. तो परिणाम सूक्ष्मातला असल्याने कळणार नाही.
~~ प्रगती होत आहे की नाही हे लोकांनी सांगण्यापेक्षा आपल्याला आपल्या मनानेच सांगितले पाहिजे की मी योग्य मार्गावर आहे.
~~ कबीराचे वाक्य नेहमी लक्षात ठेवावे- "कहत कबीरा सुन मेरे गुणिया | साहेब मिले सबुरी में ||" याला अरविंदांचे वाक्य फार सुंदर आहे, "You must have intense aspiration but with great patience." या पेशन्स चा अर्थ असा की मला मनाची शांतता पाहिजे यात शंका नाही पण ती तुझ्या इच्छेप्रमाणे, तुला हवे तेव्हा मला दे. नाम घेतले की थोडक्या काळात साधू होईल असे कठीण आहे!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड २ रा)
No comments:
Post a Comment