श्रीराम. कृष्णदास नावाचा महाराजांचा एक भक्त वरचेवर महाराजांकडे (वाणी रूपात असताना) येत असे. त्याचे म्हणणे असे की, "नामदेवाने जसे श्रीविठोबास दूध पाजले, तसे माझ्या हातून प्यावे." श्रीमहाराज म्हणाले, "दोघांत फरक इतकाच की, देव दूध पितो याची नामदेवास खात्री होती; पण माझे हातून पीत नाही याचे दुःख होते. तुला देव दूध पीतच नाही पण माझेकडून त्याने प्यावे असे वाटते आहे. आपण कोणताही आग्रह न धरता अखंड त्याचे स्मरणात असावे यातच खरे कल्याण आहे. नामस्मरण करीत जावे." त्याप्रमाणे मग तो नामस्मरण करीत असे!
~ परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांचे आत्मवृत्त
No comments:
Post a Comment