श्रीराम. आपल्याला नामस्मरणाचे खरे महत्त्वच कळत नाही. नामस्मरण हाच खरा धर्म, हेच खरे कर्म आणि हीच खरी उपासना होय. नामस्मरणानेच आत्मदर्शन घडते यात शंकाच नाही. मनापासून नाम घेणे हेच साधकाचे खरे जीवन आहे. नामाची कृपा होणे हे भाग्यवंताचे लक्षण आहे. नामस्मरण करावे असे वाटणे हीच ती कृपा होय.
**** आत्मस्वरूप प्रकट होऊ लागले, म्हणजेच तोंडात नाम येते ****
म्हणून नामस्मरण हेच खरे तप होय!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे (नामसमाधी : सहज-समाधी)
श्रीराम जय राम जय जय राम
ReplyDeleteश्रीराम जय राम जय जय राम
ReplyDelete