हृदयात भगवंत दिसू लागल्यावर साधक जेथे जातो तेथे त्याच्या बरोबर तो जातो. देहाच्या व मनाच्या कोणत्याही अवस्थेत साधक एकता असत नाही. त्याची सर्व कर्मे भगवंताच्या नजरेखाली घडतात. अर्थात त्याचे आचार विचार भगवंताला शोभेलसे असतात. उदाहरणार्थ-
स्वामी वादिराज यांचे पुष्कळ शिष्य होते. त्यांपैकी कनकदास मात्र खरा तयार होता. एका एकादशीला स्वामींनी सर्व शिष्यांना एकेक केळे दिले. ते म्हणाले, "आज एकादशी आहे. लोकांसमोर साधकाने खाऊ नये, म्हणून जेथे कोणी पाहणार नाही, तेथे जाऊन केळे खून या." पाचदहा मिनिटात सर्व शिष्य केळे खून परत आले. फक्त कनकदास मात्र केळे तसेच घेऊन परत आला. स्वामींनी विचारले, "का री? तुला कोठे एकांत मिळाला नाही का?'कनकदासाने हात जोडून उत्तर दिले, "नाही महाराज, मी जेथे गेलो, तेथे आपण माझ्या हृदयात बरोबर आलात. मला एकांत मिळाला नाही." शिष्याचे हे शब्द ऐकून स्वामींच्या डोळ्याला पाणी आले!
~ परमपूज्य बाबा बेलसरे (नामसमाधी)
No comments:
Post a Comment