श्रीराम. श्रीमहाराजांचे एक उत्तम शिष्य निवृत्ति वयानंतर घरी बसले. निवृत्तिवेतन कमी असल्याने मुलाच्या उत्पन्नातून घरखर्च चाले. श्रीमहाराज त्याला म्हणाले, "दर महिन्यात खर्चाची तोंडमिळवणी होते का? आपण सर्व चालवता हे उत्तर मला नको. प्रत्यक्ष परिस्थिती काय ती सांग." मुलाने सांगितले, "महिन्याचे शेवटचे दहा दिवस जरा जड जातात." त्यावर श्रीमहाराज म्हणाले, "अरे, ही फार चांगली गोष्ट आहे. या दहा दिवसात तरी आपला प्रपंच भगवंत चालवतो याची जाणीव राहते. अशी ओढ राहणे ही भगवंताची कृपाच समजावी."
जगामधील एकंदर पैशाबद्दल श्रीमहाराज म्हणत की, "पृथ्वीवर एक चतुर्थांश जमीन व तीन चतुर्थांश पाणी आहे. पाण्याचे एकंदर प्रमाण कायम राहते. त्याच्यात फरक होत नाही. पृथ्वीवर एकीकडे जेव्हा भरती येते तेव्हा उलट बाजूला ओहोटी असते. तसेच कुबेराकडे एकून धन कायम असते. आपल्याकडे जेव्हा त्याची भरती असते, तेव्हा दुसऱ्या कोणाकडे तरी त्याची ओहोटी असते. आपल्याकडील भरभराट म्हणजे दुसरीकडे कोठेतरी खडखडाट आहे हे निश्चित समजावे. याचा अर्थ दुसऱ्याच्या विपत्तीतून द्रव्यसंचय करून श्रीमंत व्हायचे व त्या संपत्तीचा उपभोग घ्यायचा हे कोणत्याही भगवद्भक्ताला हितावह नाही!
(हृद्य आठवणी)
No comments:
Post a Comment