Translate

Friday, July 3, 2015

डोळ्याचे महत्त्व-


श्रीमहाराज सांगत की 'सत्पुरुष त्याच्या डोळ्यांवरून ओळखता येतो. जो अनुसंधानात आहे, त्याची नजर वस्तूंकडे असूनही पूर्ण लक्ष तेथे नसते. जो सिद्ध आहे त्याची नजर लहान मुलासारखी निर्विकार असते. जो मुमुक्षु आहे, त्याची नजर आर्त असते. माणसाला झपाटणाऱ्या कुवासना बहुतांशी डोळ्यांच्या द्वारेच आत शिरतात. माणसाची वृत्ति त्याच्या डोळ्यांवरून कळते. एखाद्याची 'दृष्टी वाईट आहे' असे आपण म्हणतो. देहावसान होताना प्रथम डोळे थिजतात. प्राण गेल्याबरोबर पापण्यांची उघडझाप बंद पडते. डोळ्यांचा उपयोग भगवंताचे दर्शन करण्यासाठी केला तर त्याचे प्रेम लवकर येईल.

*** म्हणून डोळ्यांचा वापर करताना फार दक्षता ठेवावी ***

डोळ्यांना विकार झाला तर तळपायांना काशाच्या वाटीने तेल चोळतात, कानात तेल घालतात; त्यामुळे डोळे शांत होतात. म्हणून दृष्टी चांगली होण्याकरता भगवंताचे नामस्मरण करावे व ते कानांनी ऐकण्याचा अभ्यास ठेवावा. त्यामुळे चित्त एकाग्र होण्यास मदत होईल व दृष्टीही साफ होईल.

(हृद्य आठवणी)

No comments:

Post a Comment