श्रीराम. मानसपूजेच्या शेवटी भगवंताला / सद्गुरूंना हृदयात विश्रांती ग्रहण करण्यास आपण सांगतो. इतर पूजे सारखे मानसपूजेच्या शेवटी विसर्जन नाही तर विश्रांती आहे. म्हणजेच आपल्या इष्ट देवतेला आपण हृदयात स्थान ग्रहण करावे अशी विनंती करतो. यात एक मेख आहे. ज्या सद्गुरूला आपण हृदयात विश्रांती घेण्यास सांगतो, त्याला राहण्यास आपले हृदय पात्र आहे का याचा विचार सर्वांनी करावा. तिथे प्रत्यक्ष आपले सद्गुरू विश्रांती घेत आहेत म्हणजे त्यांना विश्रांतीतून जागे करेल किंवा त्यांना त्रास होईल असे वर्तन आपल्या हातून होता कामा नये, नाही का? जितके हृदय पवित्र, शांत आणि नामाने भरलेले तितके सद्गुरूंना तेथे राहण्यास आवडेल नाही का? आपण जर ते आपल्या हृदयात विश्रांती घेत असताना चुकीचे वागलो, दुसऱ्याचे अंतःकरण दुखावणारे बोललो, नीती सोडून आचरण केले, परनिंदा केली, तर त्यांच्या विश्रांतीला धक्का लागेल याचे सतत भान असणे याचे नाव खरी मानसपूजा! हे भान जर सतत राहिले ना तर तुमचा देहच मंदिर बनेल!
~ परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या प्रवचनातून
No comments:
Post a Comment