श्रीराम! महाराज देहात असताना एका बाईने त्यांना एक झेंडूचं फूल आणून दिलं. ती म्हणाली, महाराज मी लावलेल्या झाडाचं पहिलं फूल म्हणून तुम्हाला देण्याकरता आणलंय. महाराजांनी फुलाकडे पाहिलं आणि म्हणाले, आपण या फुलासारखं जगलं पाहिजे!
फुलाला कधी काही असे वाटते का की कोण माझ्याकडे पाहील का? कुणी माझा वास घेईल का? ते तसंच उमलतं. त्याप्रमाणे आपला परमार्थ हा आपल्या आतंरिक आनंदाकरता हवा. हे जे अंतरंगातले परमात्म स्वरुप आहे त्यालाही अशी उमलण्याची हौस आहे. ते होईल असे ख़त पाणी आपण अंतरंगाला घातलं पाहिजे!
~ परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या प्रवचनातून
No comments:
Post a Comment