श्रीराम. खरं पाहता रोजच्या नेहमीच्या व्यवहारात दडपण नसतं. पण काही समस्या आली की दडपण येतं. त्यावेळी आपली प्रतिक्रिया बदलणं आणि मौनात जाणं आवश्यक आहे. आतलं मन शांत करणं म्हणजे मौनात जाणं. जरूर नसेल तेथे बोलूच नये. स्वयंपाक करताना, स्वस्थ बसलेले असतो तेव्हा श्रीमहाराजांचेच विचार करावे. हे साधण्यास उपाय काय?
वस्तू समोर आली की विचार; वस्तू गेली की विचार बंद! श्रीमहाराज कोणी यायचा असला किंवा आला असला की त्यासंबंधी बोलत. तो गेला की तो विषय बंद! Out of picture, out of sight, out of mind!!!
आपल्याला मागचं तरी आठवतं किंवा पुढचं तरी विचारात येतं. उदाहरण सांगू का मनामधून कसं हलत नाही ते? घरातल्या कुणाला उशीर झाला, की विचार येतो, का उशीर झाला असेल? फोन आला का? गाड्या वेळेवर आहेत ना? वगैरे. मनाची शक्ती आपण फुकट वाया घालवतो. ती आवरली तर लगेच शांतीचा अनुभव येईल. गीतेचे ध्येय आहे- आत्मशांती! "त्यागात् शान्ति निरन्तरम्!" आणि मी हे अनुभवाने सांगेन की हे (अनावश्यक कल्पनांचा त्याग) नामाने साधते.
~~ परमपूज्य बाबा बेलसरे