श्रीराम. विषयाची आलेली ऊर्मी आपण सहन करावी. दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो. तसे अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा. म्हणजे आपण आपल्या उर्मींना आवरू शकू. प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे; ते म्हणजे अनुसंधान!
हे औषध जरी चांगल्या डॉक्टर कडून घेतलं तरी रोग्याला काही पथ्ये सांभाळावीच लागतात. शास्त्राने, सद्धर्माने आणि अभ्यासाने वागून अनुसंधानात राहणे जरूर आहे. अनुसंधानाने जे साधेल ते शतकोटी साधनांनी साधणार नाही! असे अखंड नामानुसंधान म्हणजे खरी भक्ती!
~ श्रीमहाराज
Sundar. Shree Raam
ReplyDelete